मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन कायदा २००५ ची व्याप्ती वाढवून MMRDA च्या धर्तीवर राज्याच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात झोपडपट्टी निर्मूलन करण्यात यावे,अशी मागणी रोहित पवार यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन कायदा २००५ ची व्याप्ती वाढवून #MMRDA च्या धर्तीवर राज्याच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात झोपडपट्टी निर्मूलन करण्यात यावे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री @Awhadspeaks साहेब यांना भेटून केली. pic.twitter.com/MAcr0z2lvM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 15, 2020
रोहित पवार यांनी याबाबतचे निवेदन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिले आहे. राज्यात शहरीकरण झपाट्याने वाढत असून अनेक ग्रामपंचायतीचे रूपांतर हल्ली नगर पंचायत , नगर पंचायतचे रूपांतर नगर परिषदचे रूपांतर नगर पालिकेत होत असल्याचे दिसून येत आहे नागरी भागातील या स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेळोवेळी हद्द वाढ करून ग्रामीण भागाचा समावेश देखील झाल्याचे दिसून येत आहे .
मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात झोपडपट्टी निर्मूलन होण्याकरिता अनेक योजनात अमलात आलेल्या असून आता एमएमआरडीए क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन आपण घेतलेल्या निर्णयातून होणार आहे परंतु इतर नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात राहत असलेल्या झोपडपट्टी धारकांना देखी; विचार होणे गरजेचे असल्याचे रोहित पवार यांनी निवेदनांत म्हंटले आहे.