मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे. या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यावरुन आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना न्याय फक्त कंगनाला द्यायचा आहे सर्वसामान्यांना नाही अशा कडक शब्दात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी योगी आदित्यनाथ आणि भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एका मुलीवर सामोहिक बलात्कार होतो आणि तिची निर्घृण हत्या केली जाते हे अतिशय संतापजनक आहे. योगी सरकारने त्यांच्या जाहिरात बाजीतून रामराज्याची स्वप्न नागरिकांना दाखवली होती त्यामुळे नागरिकांची मोठी दिशाभूल झाली आहे असा घणाघात राष्ट्रवादीच्या महिला रुपाली चाकणकर यांनी योगी सरकारवर केला आहे.
कायदा सुव्यवस्था त्यांच्याकडे अस्तित्वातच नाही त्यामुळे त्यांच्याकडील महिला,युवती असुरक्षित आहेत. त्यामुळे एक प्रश्न आम्हाला पडतो,आपल्याला रामराज आणायचं आहे की गुंडाराज आणायचं आहे असं स्पष्ट मत चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. एवढ सगळं असूनही पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा एक शब्दही बोलत नाही यावरून त्यांना न्याय फक्त कंगनाला द्यायचा आहे सर्वसामान्यांना नाही हे स्पष्ट होत आहे असे देखील यावेळी रुपालीताई यांनी ठणकावून सांगितले.
पीडितेचा मृतदेह परस्पर जाळण्याचे आदेश प्रशासनाला कोणी दिले याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे तसेच यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे असे म्हणत रुपालीताईंनी पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरूणीवर सामुहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे.@ChakankarSpeaks #Hathras #HathrasHorror pic.twitter.com/pKfq8HhM9g
— NCP (@NCPspeaks) September 30, 2020
Read Also
बाबरी मशीद निकाल हा देश हिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल : प्रकाश आंबेडकर https://t.co/gJt1dUMRLr @Prksh_Ambedkar @asadowaisi @Dev_Fadnavis @BJP4India
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020