पुणे: देशातील सर्वात मोठी आणि सर्वात पवित्र नदी म्हणून ओळख असणारी गंगा ही नदी आहे. भारतीय संस्कृती मध्ये गंगा नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. गंगा नदीत स्नान केल्यावर आपली सर्व पापे धुतली जाऊन मनुष्य पापमुक्त होतो अशी एक धारणा आहे. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल ही राज्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावरील असणारी राज्ये आहेत. वैशाख शुद्ध सप्तमीला गंगा सप्तमी किंवा गंगा जयंती म्हणून साजरी केली जाते. वेद आणि पुराणांमध्ये देखील गंगा नदीला विशेष महत्व दिलेले आहे.
सध्या देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. लोकांनी आता पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगेला देखील याच संकटकाळात मालिन करण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणायला हरकत नाही. ज्या गंगेच्या कुशीत पवित्र असे वाहते त्यावर आता मृतदेह तरंगायला लागले आहेत. Floating dead body in Ganga river in Bihar तब्ब्ल ४० ते ५० मृतदेह वाहत आलेले पहिल्याच स्थानिक सांगत आहेत. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे सर्व मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत आलेले आहेत. ते कोरोना रुग्णांचे मृतदेह असल्याची शंका ही व्यक्त करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकारामुळे बिहार मध्ये खळबळ माजली आहे. 45 decomposed bodies found in Ganga in Buxar
यावरून महाराष्ट्रातील नेत्यांनीही एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावरून केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर टीका केली आहे. बिहार सारखी घटना जर महाराष्ट्रात घडली असती तर भारतीय जनता पक्षाने आकाश पाताळ एक केले असते. राज्य सरकारमधील दोन चार मंत्र्यांचे राजीनामे मागितले असते. हे काय तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली असती. मृत्यूचं भांडवल कारण हे फक्त भारतीय जनता पक्षालाच जमत असे देखील रुपाली चाकणकर म्हटल्या आहेत. Rupali Chakar criticizes Narendra Modi and BJP over floating dead body in Ganga river in Bihar