सांगली – रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली होती. . येत्या 24 डिसेंबरपासून ही यात्रा सुरू होणार असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. तसेच याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केली.
”शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, असं टीकास्त्र रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सोडलं आहे. सदाभाऊ खोत यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीत मात्र संतापाचा वातवरण तापणार असल्याची शक्यता आहे.
पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात”, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.