प्रतिनिधी: विवेक पानमंद
संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचे चिन्हे दिसत असताना आता सगळीकडे लॉकडाऊन लागले तर कस होणार हीच चिंता भेडसावत आहे. महाराष्ट्रात कोरोना वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या पार्शवभूमीवर कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून लॉक डाऊन करू नये अशी मागणी केली आहे.
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन लॉक डाऊनला विरोध दर्शवला आहे. राज्यातील विवध प्रश्नांवर यावेळी त्यांनी भगत सिंह कोश्यारी यांच्यासोबत चर्चा केली आहे. सरकारला योग्य ते निर्देश देऊन १० मागण्यांचे निवेदन पण रयत क्रांती संघटनेने राज्यपालांना दिले आहे.
राज्यपालांकडे रयत करणी संघनेच्या वतीने १० मागण्यांचे निवेदन दिले आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांचा यात उल्लेख करण्यात आल्याचं माहिती समोर ये आहे. लॉकडाऊन करायचा असल्यास शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाच्या खात्यावर प्रति महिना आघाडी सरकारने १० हजार रुपये द्यावेत अशी मग्न पण यावेळी त्यांनी केली आहे.