मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला आहे तसेच राज्य सरकार त्यांच्या हातात असणाऱ्या गोष्टीं देखील का करत नाही, असा सवाल केला आहे.सारथी संस्थाही सरकारने बुडीत घातली.अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं ? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. मराठा समाजासोबत ते किती खेळणार ? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी, असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं.
संभाजीराजे आता संयमी राहणार नाही. सकल मराठा समाजाने काही निर्णय घेतले तर त्याला माझं समर्थन आहे. मी कायम तुमच्या सोबत आहे. सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मंत्र्यांना निरोप द्यावेत. मंत्र्यांनी मराठा समाजाची व्यथा, दुःख यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करावी. मुख्यमंत्री, मंत्री राज्यपालांना मराठा समाजाच्या व्यथा सांगू शकतात. राज्यपाल राष्ट्रपती यांना सांगून विशेष अधिकार मिळू शकतो असंही संभाजीराजे यांनी नमूद केलं.
संभाजीराजे म्हणाले, “आमच्या व्यथा दुःख समजून घ्या. 93 टक्के मराठा समाज गरीब आहे. ओबीसी समाजाचे अनेक नेते आले. धनगर समाजाचे मुस्लिम समाजाचे नेते आले. त्यांचं कौतुक आहे. आम्हाला ओबीसीमध्ये घुसायचं नाही. ओबीसी नेते आणि आमच्यात कुठलेही दुरावे होणार नाही. उठ सुठ सुशांत प्रकरण, आमच्याकडे पण लक्ष द्यावे अशी मीडियाला विनंती आहे.
राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज एमपीएससीची केंद्रं बंद करेल
समाजाने आपापल्या वकिलांनी काय करायला हवं हे ठरवावं, आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल. अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. म्हणून महाराष्ट्र बंद करणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा”, असा इशारा संभाजीराजेंनी सरकारला दिला.
Read Also
राष्ट्रवादी देखील बिहार निवडणुकीच्या रिंगणात ! जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोल्हे आणि मिटकरींना स्थान नाही https://t.co/8r9l2zhiIk#AmolKolhe #AmolMitkari #BiharElection2020 #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 7, 2020