मुंबई : कालच्या सामनाच्या अग्र्लेखात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख आला आणि महाराष्ट्रभर एकच चर्चांना उधाण आले. आता तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का ? अशी चर्चा जोरदार पद्धतीने सुरु झाली. यावर अनेक राजकीय विश्लेषकांनी देखील यावर भाष्य करायला सुरुवात केली. मात्र एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना स्वतः खासदार संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले आहे.
सामनाच्या अग्रलेखानुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आता एकत्र यायला पाहिजे का ? असा सवाल राऊत यांना विचारला असता सध्याची जी परिस्थिती आणि संकट महाराष्ट्रात आहे अशावेळी ज्याला ज्याला महाराष्ट्राविषयी प्रेम आहे त्या प्रत्येकाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत यांनी यावेळी महाराष्ट्रातील अनेक समस्यांबाबत भाष्य केले,कंगना प्रकरणावरून बोलताना राऊत यांनी शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे असे ठणकावून सांगितले. तसेच ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळेल कारण सर्वच लोकप्रतिनिधी याबाबत आग्रही असल्याचे देखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
Read This
‘ती’ आली ते थेट आमदारकी घेऊनच !https://t.co/7x5Zq21XdQ@mrhasanmushrif @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 14, 2020