मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. बॉलिवूड ड्रग माफियांबाबत बोलताना कंगनाने मुंबई पोलिसांबाबत अविश्वास दाखवणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर सामनामधून कंगनाच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला होता. त्याला प्रतिउत्तर देताना कंगनाने संजय राऊत यांनी आपल्याला उघडपणे धमकी दिल्याचे म्हणत एक ट्विट केले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी देत, मुंबईला येऊ नये असे सांगितले आहे, असा आरोप अभिनेत्री कंगना राणावत हिने केला असून ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीर प्रमाणे का वाटते ? असा सवालही केला आहे.कंगनाने ट्वीट करुन राऊत यांच्यावर हा आरोप केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
बाॅलीवूडमधील ड्रग माफियांविरोधातही कंगनाने भाष्य केले होते. त्यानंतर एक ट्वीट करत तिने संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, आपल्याला केंद्र सरकार किंवा हरयाणा सरकारने सुरक्षा पुरवावी असे म्हणत तिने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेणार नाही, असे जाहीर केले होते.
काय म्हणाले होते संजय राऊत
कंगनाच्या या ट्वीटनंतर राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून आगपाखड केली होती. मुंबईत राहूनही मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणे हा द्रोह असल्याचे नमूद करत राऊत यांनी कंगनाने मुंबईला येऊ नये असा सल्ला दिला होता. तिने केलेल्या विधानांबद्दल राज्याच्या गृहखात्याने चौकशी करावी, अशीही मागणी राऊत यांनी केली होती.
Sanjay Raut Shiv Sena leader has given me an open threat and asked me not to come back to Mumbai, after Aazadi graffitis in Mumbai streets and now open threats, why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir? https://t.co/5V1VQLSxh1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 3, 2020