गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी असल्याची चर्चा होती. तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील त्याबाबत भाष्य केले होते त्यानंतर आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत मार्ग काढतील असे म्हंटले आहे. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
राऊत पुढे म्हणाले, “आमदार ज्यावेळी मतदारसंघाचा विकास करतो, त्यावेळी कालांतराने राज्याचा विकास होत असतो. २८८ आमदार ज्यावेळी आपापला मतदारंघ सांभाळतात त्यावेळी ते आपले राज्य सांभाळत असतात. या विषयावर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी यापूर्वी चर्चा केली आहे. त्यावेळी मी सुद्धा तेथे होतो. काँग्रेस पक्षामध्ये किंवा अन्य पक्षांमध्ये आमदार नाराज असू नयेत. मला खात्री आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यातून मार्ग काढतील,”
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवरून चर्चा
काँग्रेस आमदारांना कमी निधी मिळतो याबाबत नेमके शिवसेनेला काय म्हणायचे आहे असे विचारले असता राऊत म्हणाले, “शिवसेनेला काय म्हणायचे आहे हे सरकारने सांगायल पाहिजे कारण हा शासकीय विषय आहे. एक विषय समोर आला आणि आम्ही त्यावर मत व्यक्त केले. आज सकाळीच मला महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा फोन आला होता. त्यांनीही ‘सामना’च्या अग्रलेखात चर्चा केली. काँग्रेसचे आमदार निधी वाटपावरुन नाराज आहेत, असे ते म्हणाले. निधीवाटपात समतोल असणे गरजेचे आहे. कारण तीन पक्षांचे सरकार आहे, अशी भूमीका त्यांनी व्यक्त केली. मला वाटते त्यांची भूमीका योग्य आहे,”
”अर्थखाते जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे अजित पवार यांच्याकडे ते खाते आहे व नगरविकास खात्याचे काही वाटत नगरपालिकांना झाले असेल. आहे, असे बाळासाहेब थोरात यांचे म्हणणे आहे. मात्र, आघाडी सरकारमध्ये एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढणे हे राज्य चालवण्याचा दृष्टीने सोयीचे असते,” असेही राऊत म्हणाले.
Read This Also
विश्वासघातकी सरकारवर जनतेने विश्वास कसा ठेवायचा, राणेंचा ठाकरे सरकारला सवालhttps://t.co/k25KRcHVA1@NiteshNRane @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 25, 2020