पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाल्यामुळे एकच खळबळ माजली होती. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे दुखावले. यानंतर पार्थ पवार यांनी कुटुंबातल्या व्यक्तींच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली
तसेच अजित पवार यांचे कुटुंब काल पुण्यात दाखल झाले होते. कालच पार्थ पवार यांनी बारामतीमध्ये काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार यांची भेट घेतली. सोबतच रात्री उशीरा अजित पवार, सुनेत्रा पवार आणि श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांच्यात बैठक झाल्याचीही माहिती आहे.
अशातच शरद पवार हे सपत्नीक पुण्यात दाखल झाले होते. त्यांनतर ते बारामतीं जाण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र शरद पवार त्यांचा बारामती दौरा अचानक रद्द करून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईवरुन निघालेले शरद पवार मध्येच पुण्यात मोदी बागेत थांबले, आणि आता ते पुण्यावरुन पुन्हा मुंबईला निघाले आहेत. पार्थ पवार नाराज असताना शरद पवार बारामतीसाठी निघाले होते, पण अचानक दौरा रद्द करुन ते पुन्हा मुंबईला यायला का निघाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.