‘राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,’ असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. सोलापूर दौऱ्यावर गेले असता त्यांनी हे विधान केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे शरद पवार , आरोग्यमंत्री राजेश टोपे सोलापूरचे पालक मंत्री दत्त भरणे हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी पत्रकार परिषद घेऊन पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली
या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. करोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून करोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.’