मुंबई – तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली, मात्र, खुद्द तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झाला. मात्र, ममता यांच्या पराभवानंतर आता देशात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. निकालामध्ये छेडछाड केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वक्तव्य केले आहे.
“पश्चिम बंगालमध्ये सबंध देशाच्या सत्तेला पराभूत व्हावं लागलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण सध्या तिथे रडीचा डाव सुरु आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
शरद पवार काय म्हणाले ?
“बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल,” असे शरद पवार म्हणाले.
रडीचा डाव!
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले आहे. मात्र, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झालाय. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता यांना 1953 मतांनी पराभूत केले आहे