मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. या दोघांमध्ये मराठा आरक्षण, अधिकाऱ्यांच्या बदल्या या काही विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सामोरी आली आहे.
शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहचले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.सध्या राज्यात कोरोनाचे संकट सरकारसमोर असतानाच मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. याप्रशवभूमीवर हि बैठक महत्वाची ठरते
या दोघांमध्ये ४५ मिनिटं चर्चा पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत मुंबईत उद्या होणाऱ्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, जीएसटीचा केंद्राकडून येणारा परतावा आणि मुख्य म्हणजे राज्यातील आयएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांवर चर्चा झाल्याचं समजतं आहे.