अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार पडेल, असे दावे भाजप नेत्यांकडून सातत्याने सुरु आहेत. त्यातच आता भाजपच्या एका मोठ्या नेत्याने एक वक्तव्य करुन राजकीय खळबळ निर्माण केली आहे. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांनी राज्य सरकार आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे, असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला आहे.
कर्डीले म्हणाले की, हे सरकार अपयशी ठरल्याचे मी बोलत नाही तर सर्वसामान्य जनता तसं म्हणते. हे सरकार कोरोनाला रोखण्यात साफ अपयशी ठरलं आहे. अनेक ठिकाणी रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. औषधेदेखील मिळत नाहीत. परंतु त्याच वेळी हॉस्पिटलची लाखो रुपयांची बिलं मात्र द्यावी लागतात. यावरुन स्पष्ट होतंय की, हे सरकार अपयशी ठरलं आहे.
कर्डीले म्हणाले की, शरद पवार सांगतायत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर फिरु दिले जात नाही. त्याचवेळी ते स्वतः मात्र या वयात सर्वत्र फिरत आहेत. शिवसेना संपवणे हा त्यामागचा एकमेव हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येते. हे करत असताना राष्ट्रवादीला कशाप्रकारे ताकद मिळेल याचा प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरु आहे.
Read Also
राष्ट्रवादी देखील बिहार निवडणुकीच्या रिंगणात ! जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोल्हे आणि मिटकरींना स्थान नाही https://t.co/8r9l2zhiIk#AmolKolhe #AmolMitkari #BiharElection2020 #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 7, 2020