अहमदनगर : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात मागील 10 दिवसांपासून पंजाब-हरियाणामधील शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी आता 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. यातच आता ‘दिल्लीतील हे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबागच सुरू झाले आहे’, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत रघुनाथ दादा पाटील यांनी दावा केला की, या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा आडतीवर काम करणारे, हमाल असे लोक अधिक आहेत.
या आंदोलनात जे लोक गोळा झाले आहेत, हे सर्व भामटे लोक आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी केले आहे.
भाजप व काँग्रेस या दोघांचे आर्थिक धोरणे एकच आहे. हे फक्त मतांच्या राजकारणासाठी चालले आहे. दिल्लीचे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबाग सुरू झाले आहे. त्याच्यापेक्षा त्याचा दुसरा काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.