मुंबई : प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या दृष्टीनं ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. सर्वाधिक संख्याबळ असलेला दुसरा मोठा पक्ष भाजपनं तीन प्रभाग समित्यांवर वर्चस्व मिळवलं तर, पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. उर्वरित नऊ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
एस अँड टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दीपमाला बढे आणि जागृती पाटील आमने-सामने होत्या. मात्र, भाजपचं एक मत अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभागृहात राडा सुरू झाला आहे. शिवसेनेनं प्रभाग समिती जिंकली आहे, मात्र, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नाही, असा आरोप भाजपनं केला आहे. भाजप नगरसेवक आक्रमक झाले असून त्यांनी सभागृहात गदारोळ सुरू केला आहे. आक्रमक नगरसेवकांनी नव्या प्रभाग समिती अध्यक्षांना आणि चिटणीसांना घेराव घातला आहे. अवैध ठरवण्यात आलेल्या नगरसेवकांचं नाव सांगितलं जात नाही, किंवा अवैध असण्याचं कारणही सांगितलं जात नाही आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे.
शिवसेनेचं कुरघोडीचं राजकारण !
मुंबई महापालिकेत कुरघोडी करत शिवसेनेनं 12 प्रभाग समिती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. गेल्यावेळी शिवसेनेकडे आठ प्रभाग समित्या होत्या तर भाजपकडे नऊ प्रभाग समित्या होत्या. या वर्षीच्या निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने चार प्रभाग समित्या जास्त मिळवून एकूण 12 प्रभाग समित्यांवर आपला झेंडा फडकावला आहे. मुख्य म्हणजे भाजपचे खासदार मनोज कोटक हे ज्या प्रभाग समितीचे सदस्य आहे. तिथल्या निवडणुकीत समसमान मते पडण्याची शक्यता होती. अशावेळी चिठ्ठीद्वारे प्रभाग समिती अध्यक्ष निवडला गेला असता परंतु निवडणुकी भाजपचे एक मत अवैध ठरवण्यात आलं. यावर भाजपने आक्षेप घेतला परंतु त्यांना ते दाखवण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेनेने फसवणूक करून प्रभाग समिती जास्त मिळवली, असा आक्षेप भाजपने घेतला आहे.
दरम्यान, एकूण 17 प्रभाग समित्यांपैकी सहा समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. यापैकी ‘जी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दत्ता नरवणकर, ‘जी/उत्तर’ प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे जगदीश मक्कुनी थैवलपिल,’सी’ आणि ‘डी’ प्रभागात भाजपच्या मीनल पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी भाजपच्या मकरंद नार्वेकर यांचा पाच मतांनी पराभव केला.
Read Also
फडणवीसांना ठाकरे सरकार देणार आणखी एक झटका ? जलयुक्त शिवार नंतर आता 'ही' मागणीhttps://t.co/foifpqOZ4C#DevendraFadanvis #BJP #MahavikasAaghadi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 17, 2020