मुंबई : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर लागलेली गळती थांबण्याचं काही चित्र दिसत नाही. यातच आज बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीही शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. बाळासाहेबांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पाहायला मिळालं, असं स्पष्ट करत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी यासंदर्भात एक पत्र देखील लिहिलं आहे.
“अमोल मिटकरी सध्या राहतात भाजप नेत्याच्या घरी”; महिन्याला मोजतात 27 हजार
रामदास कदम यांनी लिहिलेलं पत्र
जय महाराष्ट्र !
शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं.
आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले.
आघाडीच्या 941 कामांना ब्रेक; अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणही कितीही टिका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी- काॅंग्रेसचे मत फुटतील; भाजप आमदाराचा दावा
२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात. त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज “शिवसेना नेता ” या पदाचा राजीनामा देत आहे.
Read also
- “काहीच नाही केलं तर पोरगं कसं होणार, त्यासाठी..;” गडकरींची भर कार्यक्रमातच टोलेबाजी
- राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच आमदार फुटला; द्रौपदी मुर्मूंना केलं मतदान
- एसटी आंदोलनातून राज्य सरकारवर गरळ ओकणारे पडळकर, खोत आता गप्प का?
- “राजकारण हे तुमचं काम नाही, म्हणून तुमची ही अवस्था”
- “मलाही गुवाहाटीला घेऊन जालं का ? “मुख्यमंत्र्यांकडे चिमुकलीने केला हट्ट