प्रतिनिधी: ओंकार गोरे
पुणे: जागतिक कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लोटेने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. माहामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार गर्दी टाळण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांना नियमांच भान राहिले नसल्याचे चित्र आहे. राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नियम धाब्यावर बसवत कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या गर्दीत विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावत असल्याचे दिसून येत आहे. पोटापाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गोरगरिबांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असताना महाविकास आघाडी सरकार मंत्री संदीपान भुमरेंवर कारवाई करणार का? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जागतिक महामारीने राज्यासह पैठण तालुक्याला घट्ट मिठीत घेतले आहेत. पैठण तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज सुमारे ५० च्या आसपास लोक एकट्या पैठण तालुक्यात मृत्यूमुखी पडत आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक बेड तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धावाधाव करत आहेत. असा स्थितीत नागरिकांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी राज्य सरकार आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेल्या मंत्र्यांनी पुढे येणे अपेक्षित आहे. परंतू, सरकारमधील काही मंत्री साधा प्रयत्न करताना सुद्धा दिसत नाहीत.
पैठण तालुक्यातील कोरोनाचे हे विदारक रुप पाहायला मिळत असतानाच रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याहस्ते देवगाव येथील रोजगार हमी योजनेच्या विविध कामाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मंत्री भुमरे यांचे पुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे, चित्तेगावचे जिल्हा परिषद सदस्य अक्षय जायभाये, देवगावचे सरपंच रामलाल कोथळी, पंचायत समिती सदस्य सोपान थोरे, देवगावचे उपसरपंच बाळासाहेब गीते, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर गीते, भगवान ढगे, पंढरीनाथ गीते, दीपक ढाकणे, अमोल गीते, ग्रामरोजगार सेवक मदन बोंदरे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोनाने राज्यात प्रकोप मांडला असताना दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. अशतच राज्याचे मंत्रीच नियम पायदळी तुडवून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत असल्याचे चित्र पैठणमध्ये दिसून आले आहे. सर्वसामान्य जनतेवर कारवाई करण्याचा ठाकरे सरकारने बडगा उचलला आहे. विनाकरण रस्त्यावर फिरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन कऱणाऱ्या जनतेवर प्रशासनाकडून दंड ठोठावण्यात येत आहेत. मग हे नियम राजकाऱण्यांना किंवा सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांना लागू होत नाहीत का? महाविकास आघाडी सरकार आता आपल्याच मंत्र्यावर कारवाई करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री मुठ गिळून गप्प का?
राज्या सर्वसामान्य जनतेसाठी संचारबंदी सारखे नियम लादले आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनता रोजी-रोटी साठी तळमळत आहे. दुसऱ्या लाटेत लादण्यात आलेल्या संचारबंदीमुळे जनतेवर उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. शिवाय रोजी-रोजी साठी तळमळण्या जनतेने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केलाच तर सरकारकडून कठोर कारवाई केल्या जात आहे.
अशा परिस्थिती सर्वपक्षांनी एकत्र येवून सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र एकीकडे ठाकरे सरकार घरात बसण्यासाठी विनंती करत असताना दुसरीकडे ठाकरे सरकारमधील मंत्री सर्रासपणे नियम धाब्यावर बसवून विकासकामांच्या नावाखाली गर्दी जमवत आहेत. खऱ्या अर्थाना कोरोना माहामारीचे संकट महाराष्ट्रात घोंगावत असताना विकास कांमांची भुमीपूजन करणे एकढे महत्वाचे आहे का?, या विदारक चित्रांवर कारवाई करणे गरजेचे वाटत नाही का?. परंतू सरकारकडून कारवाई करणे तर दुरच राहिले मुख्यमंत्री साधे बोलायला सुद्धा तयार नाहीत. यावर तात्काळ कारवाई होणे गरजेचे असून मुख्यमंत्र्यांनी गप्प न बसता धडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप पक्षाकडून कऱण्यात येत आहे.
खासदार सदाशिव खाडेंवर गुन्हा दाखल!
वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपतीव्यवस्थापनकायदा आणि प्रतिबंधात्मक_कायदा लागू करणयात आला आहे. परंतू मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केराची टोपली दाखवली होती. खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह सुमारे दोनशे ते अडीचशे जणांनी पिंपरी निर्मळ येथे निळवंडे कालव्यांच्या कामाचे भूमीपूजनाचा कार्यक्रम घेतला होता. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे करण विलास कोळगे यांनी आक्षेप घेतला होता.
या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कोरोना काळातील जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. खासदाराच्या पाठोपाठ आमदार भुमरेंनीही मुख्यमंत्र्यांना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार संदीपान भुमरेंवर कारवाई करणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.