मुंबई: अभिनेता सुशांतिसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्र आणि बिहारमध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे.बिहार निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.’ बिहारच्या निवडणुकीचा निकाल, सुशांत सिंह केसचा निकाल व एनसीबीचा अहवाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार, ‘ अशी टीका त्यांनी ट्विट करून केली आहे.
बिहारच्या निवडणुकीचा निकाल, सुशांत सिंह केसचा निकाल व एनसीबीचा अहवाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार. तसेच अमेरिकेतील निवडणुका व कोविडची लस आहेच. त्यानंतर मात्र मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल. तोपर्यंत ज्या व्यक्तींवर, कलाकारांवर आरोप होतील, त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,’ असं म्हणतं सरनाईक यांनी विरोधांवर निशाणा साधला आहे.
बिहारच्या निवडणुकीचा निकाल, सुशांत सिंग केसचा निकाल व एनसीबी चा अहवाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार. तसेच अमेरिकेतील निवडणुका व कोविडची लस आहेच. त्यानंतर मात्र मुंबई वरचे प्रेम उफाळून येईल. तोपर्यंत ज्या व्यक्तींवर, कलाकारांवर आरोप होतील त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 25, 2020
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून अनेक वळणं घेत हा तपस ड्रग्स प्रकरणावर थांबला आहे. ड्रग्ज सेवन प्रकरणाची चौकशी एनसीबीकडून सुरू असून, एनसीबीनं या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत इतर काही जणांना अटक केली आहे.
Read Also :
शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरून केला शेती विधेयाकाचा विरोध,राष्ट्रपतींची विधेयकावर स्वाक्षरी अद्याप बाकी https://t.co/mhJnw39xzI @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dadajibhuse @rajushetti @Dev_Fadnavis @BhatkhalkarA @meNeeleshNRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 25, 2020