मुंबई : अभिनेत्री कंगना आणि शिवसेनेतील वादानंतर कंगना चार दिवसांनी पुन्हा एकदा आपल्या गावी मनाली येथे जात आहे. विशेष बाब म्हणजे मुंबई सोडताना कंगनाने पुन्हा एकदा ट्विटच्या मार्फत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र कंगना मुंबई सोडून जाताच कंगना विरोधात आक्रमकतेने भूमिका मांडणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ज्यांनी ज्यांनी कंगनाचे समर्थन केले त्यांनी तोंड काळे करावे अशा आशयाचे एक ट्विट केले आहे.
प्रताप सरनाईक यांनी वारंवार कंगनाच्या वक्तव्यांचा निषेध केला होता. कंगनाने मुंबई सोडून जाताच सरनाईक यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात ‘कुत्रीचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच’ या म्हणीचा अर्थ मला आज तंतोतंत कळला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली आता मारा बोंबा… असे म्हणत सरनाईक यांनी कंगना समर्थकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
'कुत्रीचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच' या म्हणीचा अर्थ मला आज तंतोतंत कळला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली
आता मारा बोंबा…
जय महाराष्ट्र !— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 14, 2020
मुंबई सोडताना काय म्हणाली होती कंगना
“मी जड मनाने मुंबईतून जात आहे. गेल्या काही दिवसांत मला प्रचंड त्रास दिला गेला. माझ्यावर हल्ला झाला. खोटे आरोप केले गेले. माझं कार्यालय तोडलं. माझं घर तोडण्याची धमकी दिली गेली. सुरक्षारक्षक हत्यारं घेऊन माझं संरक्षण करतायत. मला वाटतंय पाकिस्तानशी तुलना करणं योग्यचं होतं.” मुंबई सोडताना कंगनाने अशा आशयाचं ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे तिने पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
With a heavy heart leaving Mumbai, the way I was terrorised all these days constant attacks and abuses hurled at me attempts to break my house after my work place, alert security with lethal weapons around me, must say my analogy about POK was bang on. https://t.co/VXYUNM1UDF
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020