औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के आटोपल्या आहेत. मराठवाड्यात यंदा सरासरी ५० लाख १२ हजार ६४१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४० लाख ९६ हजार ८७६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सरासरी २० लाख ९३ हजार ४९३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १८ लाख ८३ हजार २८५ हेक्टरवर अर्थात ९० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातील सरासरी २९ लाख १९ हजार १४८ हेक्टर खरीप क्षेत्राच्या तुलनेत ७६ टक्के अर्थात २२ लाख १३ हजार ५९१ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
१७ लाख हेक्टरवर सोयाबीन यंदा मराठवाड्यात खरिपातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १६ लाख ६३ हजार १५ हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात त्याच्यापुढे जाऊन १०७ टक्के क्षेत्रावर अर्थात १७ लाख १६ हजार ४१४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे.