१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. विदर्भ, मराठवाडा, खांदेश, प. महाराष्ट्र व कोकण असे भौगोलिक प्रांत एकत्र झाले. सर्व महाराष्ट्राचा समतोल विकास होईल या आशेवर विदर्भ, मराठवाड्यातील जनताही आनंदाने सहभागी झाली. परंतु १ मे १९६० ते २०१४ पर्यंतचा इतिहास पहिला तर विदर्भ, मराठवाडा व खानदेशाच्या पदरी निराश्याच पडल्याचे दिसून येते. विदर्भ मराठवाड्यामध्ये तब्बल १९ जिल्हे, नैसर्गिक वनसंपदा, मोठे खनिजसाठे अशी चांगली नैसर्गिक समृद्धी असूनही हा भाग मागासलेलाच राहिला; कारण स्पष्ट आहे. “जिसकी लाठी, उसकी भैस”. राजकीय दृष्ट्या बहुतांशी मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने धरणे, सहकारी साखर कारखाने, सहकारी दुध संस्था, रस्ते, कृषी पंप, वेगवेगळे विकास प्रकल्प प्राधान्याने पश्चिम महाराष्ट्रात झाले. नाही म्हणायला विदर्भालाही मुख्यमंत्री पद त्याकाळात मिळाले परंतु इतर पॉवरफुल मंत्र्यांच्या दबावामुळे त्यांनाही विदर्भाचा, मराठवाड्याचा विकास साधता आला नाही.
सन २०१४ मध्ये मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि वंचित महाराष्ट्रातील जनतेमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. कधी नव्हे ते विदर्भ, मराठवाड्यातील विकासकामे प्राधान्याने होण्यास सुरुवात झाली. परंतु याचा अर्थ त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विकासकामे थांबविले असे नाही. फक्त फरक एव्हढाच होता की, देवेंद्रजींनी विदर्भ मराठवाड्याला समान न्याय देण्यास सुरुवात केली. मा. देवेंद्रजींच्या काळात विदर्भ, मराठवाडा व खांदेशासाठी अतिशय उपयुक्त ठरलेली जलयुक्त शिवार योजना गावोगावी पोहोचली. अतिशय कमी रकमेमध्ये शेकडो हेक्टर जमिनीला सिंचनाची सुविधा खेडोपाडी निर्माण झाली. दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे मा. देवेंद्रजींनी टाकलेले ते मोठे पाऊल होते. मा. देवेंद्रजींनी विदर्भातील भोसा खु., जिगाव या प्रकल्पांना चालना देत असतांना संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवून मराठवाड्यास दुष्काळमुक्त करणारा ‘मराठवाडा वाटर ग्रीड’ प्रकल्प मंजूर केला. एवढेच नाहीतर आघाडी सरकारच्या काळात दुर्लक्षित असलेला सोलापूर जिल्हा, सातारा/सांगली जिल्ह्यातील दुर्लक्षित दुष्काळी पट्ट्यालाही न्याय देण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने वंचित महाराष्ट्राचे तारणहार म्हणून मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रथमच दुर्लक्षित महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
दुर्लक्षित महाराष्ट्राला न्याय देतांना मी देवेंद्रजींनी महाराष्ट्राला देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात अग्रेसर राज्य बनविले. देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक, नागपूर-मुंबई ला जोडणारा समृद्धी महामार्ग, मुंबई मधील मेट्रोचे जाळे, पुणे मेट्रो, PMRDA ची स्थापना करून पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील विकासाचे अनेक विकास प्रकल्पांना गती दिली. नागपूर मेट्रोला गती देतानाच अमरावती, अकोला, चंद्रपूर, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर या शहरांमधील विकासकामेही गती द्यायचा प्रयत्न केला. थोडक्यात मा. देवेंद्रजींच्या काळात महाराष्ट्र प्रगतीच्या शिखरावर गेला व एवढेच नाही तर हे सर्व प्रकल्प राबवितांना एक तत्व कायम राखले गेले ते म्हणजे पारदर्शकता Zero tolarance on corruption हे तत्व मा. देवेंद्रजींनी कायम ठेवले.
मा. देवेंद्रजी हे देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे लाडके का आहेत ? याचे एकमेव उत्तर म्हणजे गत ६ वर्षात सत्तापदावर असतांना, सत्तेची फळे थेट गोरगरीब जनतेला कशी मिळतील ? याकरिता मा. देवेंद्रजींनी केलेला प्रयत्न, डीबीटी अर्थातच Direct Benefit Transfer प्रत्येक विभागात आणून मा. देवेंद्रजींनी एकाच फटक्यात दलालांचा सुळसुळाट नियंत्रणात आणला. SC/ST Scholership चा लाभ DBT नसल्यामुळे विद्यार्थ्यांना न होता संस्था चालकांना होत होता, परंतु DBT आणले आणि थेट अनुसूचित जातीजमातीच्या विद्यार्थ्यांना लाभ सुरु झाला. आदिवासी खाते ; कृषी खाते, सामाजिक न्याय खाते, महिला व बालकल्याण खाते इ. खात्यातील भ्रष्टाचार एकाच फटक्यात कमी झाला. रस्ते बांधणीमधील भ्रष्टाचार जगजाहीर होता. हा भ्रष्टाचार नियंत्रित करण्यासाठी ३ लाखावरील निविदा इ-निविदाच असावी हा निर्णय तर विरोधी तसेच स्वपक्षातील आमदारांनी आग्रह करून देखील फिरविला नाही.
राजकारणात स्त्रियांना खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळे घरच्यांचाही विरोध होतो; परंतु मा. देवेंद्रजी फडणवीस राजकारणात आहेत ही अनेक भगिनींसाठी आशेची बाब आहे. कोणतीही अडचण असली की, देवेंद्रजी मोठा भाऊ म्हणून कायम पाठीशी असतात. केवळ मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून सातत्याने जनतेच्या अडचणी सोडविण्याच्या प्रयत्न केला. एकदा कोरोना होऊनही ते जनतेमध्ये जात राहिले एवढेच नव्हे तर केवळ शासनावर अवलंबून न राहता, स्वतःच्या मतदारसंघात कोरोना सेंटर सुरु करा असा आदेशही सर्व भाजपच्या आमदारांना दिले. त्यांच्याच आवाहनाला अनुसरून मी चिखली मध्ये २ कोव्हीड केयर सेंटर सुरु केले. त्यांच्या वाढदिवशी एवढेच म्हणावेसे वाटते की, आमचा हा नेतृत्व घडविणारा नेता, संकटात पाठीशी असणारा वडीलबंधू शतायुषी होवो.
आमदार श्वेता विद्याधर महाले