कोल्हापूर : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे उपाय योजना आणि इतर सुविधांची कमतरता अनेक जिह्यांमधे भासत आहे. त्यातच कोल्हापूरमध्ये देखील वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन पुन्हा शक्य नसल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.
कोल्हापूर वर सातारा, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग येथील रुग्णांचा ताण मोठ्या प्रमाणावर पडत आहे त्यामुळे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातच रुग्णांची सोय करावी असे आवाहन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे. तसेच काही दिवसात कर्नाटकाला जाणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा देखील रोखणार असल्याचे सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.
इतर जिल्ह्यातील रुग्ण कोल्हापुरात उपचारासाठी येत असल्यामुळे कोल्हापुरातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याचे देखील सतेज पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तसेच नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी जेणेकरून ते आजारी पडणार नाहीत असे आवाहन यावेळी बोलताना पाटील यांनी समस्त कोल्हापूरकरांना केले आहे.
Read Also
स्वतःच ट्विटर स्वतः हँडल करायच असत, राजकीय पक्षाच्या सेलला द्यायचं नसतhttps://t.co/KyUTpp8j5g@rautsanjay61 @KanganaTeam
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 5, 2020