गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली होती गेले तीन दिवस मुंबईमध्ये पावसाची संततदार सुरूच होतीय तसेच मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी साठल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस चालू होता. समुद्रालाही उधाण आले होते
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी भरले होते, तर समुद्रालाही उधाण आल्याने पाणी रस्त्यावर आले होते. तसेच या पाण्यासोबत सर्व गाळ आणि कचरा रस्त्यावर आला होता. त्यामुळे तीन दिवसाच्या ओसरलेल्या पावसानंतर मुंबईतील सफाई कामगार पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत उतरले. पावसामुळे साचलेला कचरा अंडी गाळ साफ करण्यासाठी सर्व कर्मचारी सज्ज झाले होते.
खा. सुप्रियाताई सुळे या मरीन लाईन्स येथून गाडीने जात असताना त्यांना भर पावसात समुद्राच्या पाण्यामुळे आलेला कचरा साफ करणारे सफाई कर्मचारी दिसले. सुप्रियाताईंनी गाडी थांबवून या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली तसेच त्यांचे आभार मानले.