मुंबई : कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी आणि साठवणूक क्षमतेवर मर्यादा घातल्यानंतर राज्यभर कांदा प्रश्न तापला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीत कृषीमंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते.
या बैठकीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. आमच्या मनात संतापाची भावना आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं खूप मोठ नुकसान होत आहे. मोठमोठ्या नेत्यांच्या बैठका होतात. तरी तोडगा का निघत नाही? दिवाळीचा सण तोंडावर आला असताना आम्ही करायचं काय? आम्ही अंमली पदार्थ विकतोय का? आम्ही कांदा शेती बंद करायची का? असे सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले.
आम्हाला निर्णय लवकर पाहीजे. आमचा कांदा लवकरात लवकर व्यापाऱ्यांनी घेतला पाहीजे, अशी भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली. दरम्यान काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनेने सारवासारव करताना स्वतःची बचावात्मक भूमिका घेतली आहे.
कारण सरकार शरद पवार नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच चालवतात असं वक्तव्य शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केल आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांना भेटावे, असा सल्ला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिल्यानंतर शिवसेनेने या प्रकरणात सावध प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवारांना भेटायला सांगितले याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार शरद पवार चालवतात असा घेवू नये, असे मत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री तसेच शिवसेनेचे प्रवक्ते उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यपालांनी मनसे अध्यक्षांना पवार साहेबांना का भेटायला सांगितलं? हे त्यांनाच माहीत. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हेदेखील मला माहीत नाही, त्यावर बोलणं योग्य नाही. त्यांनी केलेल्या व्यक्तव्याचा आपण अर्थ लावू तसे वेगवेगळे अर्थ लागू शकतात.
Read Also :
सर्व मंत्री १ नोव्हेंबरला काळ्या फिती लावून काम करणार, मंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रस्तावाला मंजूरीhttps://t.co/XApnDdXitm @mieknathshinde @ShivSena @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020