चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतील आठवीतल्या विद्यार्थिनीने दारूबंदी कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत भावनिक साद घातली आहे. मद्यपी चालकाने माझ्या तेजसदादाच्या गाडीला धडक मारावी का? आणि माझे बाबा झिंगून घरात यावे हे आदित्यदादांना रुचेल का, असे प्रश्न करत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी, अशी मागणी तिने केली आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन जिल्ह्यांतील दारूबंदी कायम ठेवावी की ठेवू नये यासंबंधी समिती स्थापण्यात आली. मात्र, आदिवासींनी याविरोधात लढा पुकारला आहे. यांच्यातीलच एका आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने दारूबंदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच पत्र लिहिले आहे.
चिमुकीलीने अगदी भावनिक होऊन हे पत्र लिहिले आहे. तिने पत्रात म्हटले आहे कि, “मद्यपी वाहनचालकाने निरपराध जनतेला चिरडून जावे किंवा माझ्या तेजसदादाच्या गाडीला धडक मारावी या विचारानेही अंग शहारते. आपण सर्व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज आहोत आणि माँ जगदंबेची ओटी कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या करातून आम्ही कशी काय भरणार? माझे बांधव, माता-भगिनी आनंदाने, सुखाने नांदोत, अशी मागणी आपणच आपले सर्वांचे दैवत पंढरीच्या विठोबांकडे करतो. मग दारूबंदी उठवावी, हा आपल्या मंत्रिमहोदयांचा अनाठायी आग्रह का असावा?”
Read also –
आमदार रोहित पवार यांचे जामखेडवासी भयभीत; काय आहे कारण? https://t.co/CePC4VICYI @RRPSpeaks @RohitPawarOffic @RohitPawarSpeak @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 3, 2020