मुंबई : राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. शिवसेनेच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सगळ्याचं लक्ष्य न्यायालयाच्या निकालाकडे लागून राहिलं आहे. मात्र यातच मंत्रालायच्या प्रवेशाद्वाजवळ झळकणारी संत गाडगेबाबांची दशसुत्री हटवल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
“शाळेमध्ये जिला आम्ही पाहिलं नाही, त्या शारदा मातेचा फोटो लावला जातोय”; छगन भुजबळ
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर झळकणारी संत गाडगेबाबा यांची दशसूत्री हटवण्याचे काम इडी सरकारने केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. गाडगेबाबांची ही दशसूत्री म्हणजे जनताभिमुख कारभाराचा वाटाड्याच आहे. मात्र शिंदे सरकारने ही दशसुत्रीच हटवूनआपला कारभार कसा चालणार हेच दाखवून दिल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहेत.
आता किरीट सोमय्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार? शिवसेनेचा सवाल
अत्यंत धक्कादायक…! मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर असलेलली ” संत गाडगेबाबांची” दशसुत्री शिंदे फडणवीस सरकारने हटविली. गाडगेबाबांच्या दशसूत्रीवर आम्ही चालणार नसुन केवळ “खोक्यांच” राजकारण करणार आहोत असा अप्रत्यक्ष संदेश तर या सरकारने दिला नसेल ना.? असं खोचक सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अत्यंत धक्कादायक –मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर असलेलली ” संत गाडगेबाबांची” दशसुत्री शिंदे फडणवीस सरकारने हटविली. गाडगेबाबांच्या दशसूत्रीवर आम्ही चालणार नसुन केवळ “खोक्यांच” राजकारण करणार आहोत असा अप्रत्यक्ष संदेश तर या सरकारने दिला नसेल ना.? pic.twitter.com/sAgRm6A8X3
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 27, 2022
Read also
- माझा आई भवानीवर अन् न्यायालयावर विश्वास, लढाई आम्हीच जिंकू..! उद्धव ठाकरे
- राऊतांना दिलासा नाहीच..! दसरा मेळाव्याचं भाषण ही तुरूंगातून पाहणार?
- “शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागणार?” सुप्रीम कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
- आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची मस्ती वाढलीय..! जयंत पाटील यांची सडकून टीका
- “अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देऊ”; भाजपचा शिवसेनेला इशारा