अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला. आता हे प्रकरण सीबीआयकडे सुपुर्द करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. या सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेत्यांचे नाव घेण्यात येत आहे. हे राजकीय षडयंत्र असून या प्रकरणात आमच्या नेत्यांचे कुठलाही संबंध नाही अशी प्रतिक्रिया नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह प्रकरणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. कारण यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाविकास आघाडीतील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव देखील चर्चेत आले होते. मात्र आता या प्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे देण्याचे निश्चित केले आहे.
काय म्हणालेत एकनाथ शिंदे नेमकं
हे न्यायालयीन प्रकरण आहे त्यामुळे यावर भाष्य करणे लगेच योग्य ठरणार नाही.
जे काही आरोप प्रत्यारोप होताहेत . . ते सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे.
अगदी खालच्या पातळीवरचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत.
आदित्य ठाकरेंचा याच्याशी काहीही संबंध नाही,त्यांच्यावर आरोप करणे हे दुर्दवी
पुराव्या शिवाय कोणीही आरोप करू नहे
Video