मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी 8 वाजता मातोश्री निवासस्थानावरुन ते सोलापूरसाठी रवाना झाले होते. राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा देणारआहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता आढावा बैठक घेणार आहेत. नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर मधील यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरासन केले. नुकसानाबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
“राजकारण करायचं नाही. केंद्राकडे राज्याचं देणं बाकी आहे. ती मदत आली तर मदतीची गरज पडणार नाही. येणं आलं तर हात पसरावं लागणार नाही. विरोधकांनी त्यावर राजकारण करत बसू नये. शेतकऱ्यांसाठी जे जे करावं लागेल ते करू. दोन-चार दिवस दौरे करणार आहे. माहिती घेत आहे. त्यानंतर शक्य तेवढी मदत करू. हे तुमचं सरकार. शेतकऱ्यांचं सरकार , वाऱ्यावर सोडणार नाही” अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “मदत किती करावी यांची माहिती गोळा करतो आहे. माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार हे सरकार तुम्हाला नाराज करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हे शेतकऱ्यांचं आणि जनतेचं सरकार. आपत्ती मोठी आहे. धोका कायम आहे. सावध राहा. मुख्यमंत्री रामपूरमध्ये दाखल, घरांच्या नुकसानीची पाहणी. केंद्राने राज्याची देणी वेळेत द्यावी. देणी दिली तर मदत मागावी लागणार नाही.”
Read also:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर; नुकसानग्रस्तांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता https://t.co/hjwEtLT4KP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020