मुंबई : अचानक ईडीने शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर ठाकरे सरकार विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांची यादी अर्थमंत्रालयाकडे सोपवणार आहे असा धमकी वजा इशाराच दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीदिनी ‘सामना’ला मुलाखत दिली. सरकारने एक वर्ष पूर्ण केले. सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत! असा दणकाच त्यांनी सुरुवातीला दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखतीत सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली.
‘ईडी उत्खनन करत मोहेंजोदारो आणि हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मला, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा महाविकास आघाडीतील आणखी प्रमुख नेत्यांना ईडीची नोटीस आली, तर धक्का बसणार नाही’ असं राऊत म्हणाले. तर, ‘माझ्याकडेही काही नावं आहेत. सध्या यांची सुरू असलेली सर्व कारवाई पूर्ण झाल्यावर मी सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी अर्थमंत्रालयाकडे सोपवणार आहे. त्यानंतर ईडी कोणाकोणावर कारवाई करते ते आपण पाहूच,’ असं सूचक विधान त्यांनी केलं होतं.
Read Also :
शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली’ मार्चनं दिल्लीच्या सीमांना छावणीचं स्वरुप
पंतप्रधान मोदींना पुण्यात अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतला मोठा निर्णय
‘पाच वर्ष आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खाणाऱ्यांवर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ’