मुंबई : शिंदेभाजप सरकारवरील विश्वासदर्शक ठराव ९९विरुद्ध १६४ मतांनी मंजूर झाला. मुस्लि समाजाचे प्रतिनिधित्व करणारे एमआयएम व समाजवादी अबू आझमीचे ३ आमदार तटस्थ राहिले. म्हणजेच त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष मदत केली. २८७ पैकी २६६ जण मतदानात सहभागी झाले. असं प्रसिध्द विचावंत हरी नरके यांनी म्हटलं आहे.
अध्यक्ष मतदानात नव्हते. तर यावेळी २० आमदार गैरहजर राहून कुणाला मदत करीत होते? यातले काही आजारी असतील. तरी १७ /१८आमदार गैरहजर राहून भाजपला मदत करतात व त्यांचे आभार उपचाणक्य मानतात. त्यात काँग्रेसचे १०होते. सेनेचे ४० उघड फुटले तर अपक्ष, राष्ट्रवादीचे काही व काँग्रेसच्या १०आमदारांनी गैरहजर राहून भाजप सरकारला मदत केली. अशाही चर्चा सध्या सुरू आहेत. असंही ते म्हणाले.
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी ठरवले असते तर मविआघाडी मोडून सगळा शिवसेना पक्ष घेऊन ते भाजप सोबत परत जाऊ शकले असते.पण ते ठाम राहिले. आज सर्वच पक्षातील व अपक्ष आमदार इडीशाहीला टरकलेले आहेत. त्यांना मोदी शहा योगी फडणवीस सोमय्या यांना अंगावर घ्यायचे नाही.
ज्या सरकारवर अहोरात्र माफिया, भ्रष्ट सरकार असे आरोप केले जात त्यातल्या ५० उघड आणि २० अप्रत्यक्ष आमदारांना घेऊन बनलेले हे उपचाणक्य सरकार भ्रष्टाचारविरोधी आहे की महाभ्रष्ट? तरीही माध्यमं आणि मध्यम व उच्चमध्यमवर्ग मोदी शहा योगी फडणवीस सोमय्या सरकारचे गुणगान गात आहेत. असंही ते म्हणाले.