नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरसहीत उत्तर भारतातील अनेक ठिकाणी वायू प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंजाब मध्ये जाळण्यात येणारा सुके गावात आहे. आता या मुद्द्यावरुन राजकारण तापत असताना दिसत आहे मात्र हे राजकारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात ट्विटरच्या माध्यमातून सुरु झाले असल्याचे दिसत आहे.
.@DrPramodPSawant Its not abt Delhi’s pollution vs Goa’s pollution. Both Delhi and Goa are dear to me. We are all one country. We all have to work together to ensure there is no pollution in both Delhi and Goa. https://t.co/AWiIg7zX1W
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 11, 2020
अरविंद केजरीवाल यांनी गोव्यामध्ये पर्यावरणासंदर्भात सुरु असणाऱ्या विरोध प्रदर्शनाला पाठिंबा देणारी प्रतिक्रिया ट्विटरवरुन दिली. यावेळी त्यांनी राज्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. मात्र आता केजरीवाल यांच्या या ट्विटला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर ट्विटच्या माध्यमातून दिले आहे. केजरीवाल यांनी पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या गोव्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचे ट्विटरवरुन कौतुक केले. मात्र त्याचवेळी त्यांनी राज्यातील भाजपा सरकारवरही निशाणा साधला.
राज्यात होणारे विरोधप्रदर्शन दाबून टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. याच ट्विटवर उत्तर देताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांना दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. केजरीवाल यांनी गोव्याची चिंता करु नये असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.
Dear CM @ArvindKejriwal ji, we are making sure that there is no pollution issue in Goa and our Govt will ensure that our state remains pollution free. I am sure the people of Delhi also want the same in their beautiful state. https://t.co/tUHU2wqmdV
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) November 11, 2020