मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस याना आणखी एक धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे . शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणलेली ‘बळीराजा चेतना योजना’ बंद करण्याचा निर्णय काल घेण्यात आला.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले आहे. त्यामुळे 24 जुलै 2015 रोजी जाहीर करण्यात आलेली ही योजना तातडीने बंद करण्यात येत आहे, असे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने बुधवारी जारी केले.
अशी होती ‘बळीराजा चेतना योजना’ –
‘बळीराजा चेतना योजना’ या 2016 मध्ये अंमलात आलेल्या या योजनेत व्यथित शेतकर्यांना शोधणे, शेतकर्यांच्या मुला-मुलींसाठी सामूहिक विवाह आयोजित करणे, त्यांना उत्तम आरोग्य सेवा पुरवणे आणि कर्जाचे पुनर्गठन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.
अडचणीत आलेल्या शेतकर्यांना मदत देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य, महसूल, वित्त, जलसंपदा आणि महिला व बालकल्याण विभागांच्या योजनांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्तावही फडणवीस सरकारने मांडला होता.