मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च ठरवले जातात. परंतु नार्वेकरांनी संपुर्ण आदेश ढाब्यावर बसवले आहेत. मुळ प्रकरण अपात्रबाबत होतं. परंतु राहुल नार्वेकरांनी कुणालाही अपात्र केलं नाही. यातच शिवसेना नेमकी कुणाची ?हे लहान मुलं देखील सांगू शकतो. परंतु राहुल नार्वेकरांनी निर्णय देतांना त्यांचा पायाच चुकला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा नार्वेकरांनी अपमान केला आहे. त्यामुळे याबाबत अवमान याचिका दाखल करता येते का ? ते पाहवं लागणार आहे. अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
देशातील लोकशाही यांनी पायदळी तुडवली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्यात आला आहे. 2018 ला केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर मग गद्दार कुणाच्या निर्णयावर निवडून आले होते. जसा एक नेता असतो. त्याचे सहकारी असतात. दिशा दाखवण्याचे काम नेता करत असतो. हाच निकाल ते अगोदर देता येऊ शकले असता. परंतु त्यांनी याबाबत फक्त नाटक केलं आहे. दहा जानेवारीची तारीख त्यांनी ३१ डिसेंबर ठेवली. असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. यातच आम्ही याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. त्यांनी देखील या प्रकरणाबाबत सर्व काही पाहिलं आहे. त्यांना काही माहिती हवी असेल तर ती द्यायला तयार आहोत. असेही ठाकरेंनी म्हटले आहे.
निवडणुकीच्या आधी दुध का दुध पाणी का पाणी झालं पाहिजे. कारण यांना फक्त निवडणुक काढायची होती. शिवसेना संपत नाही. मिंधे किंवा गद्दारांची शिवसेना हे महाराष्ट्राची जनता बघत आहेत. शिंदेंची शिवसेना ही होऊच शकत नाही. कारण हे नातं तुटलेले आहे. ज्याप्रमाणे आरोपींनी न्यायमूर्तींची भेट घेतली होती. तेव्हाच त्यांचं ठरलं होतं. यातच निकाल माहिती होतचं म्हणून पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. दौवास दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे हे सर्व फिक्स होतं. असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. तसेच जनतेच्या न्यायालतच तर टिकणारच नाही. काल केलेले आरोप ते सत्य आहेत.