मुंबई : मराठा आरक्षणाचा तिढा कायम असतानाच आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. आगामी काळात धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण ३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवकरत धनरांना आरक्षण दिले नाही तर मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत पडळकर यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी केलेली तरतुद कुठे गेली, असे म्हणत समाजाला आरक्षण न मिळु देण्यामागे बारामतीच्या काका- पुतण्याचा हात असल्याचा घणाघात पडळकरांनी केला आहे.
३१ मे रोजी धनगर समाजाने आरक्षणाचा जागर करावा. झोपी गेलेल्या सरकारला जागं करावं, असं आवाहन पडळकर यांनी केलं होत. आज त्याच पार्श्वभूमीवर बोलत असताना पडळकरांनी घणाघात साधला आहे. पुर्वी जात पात नव्हती, मात्र आता केवळ जातीच्या जोरावर सगळ काही चालू आहे. जातीवादाचा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी शोधून त्यांना जाब विचारला पाहिजे. अर्थसंकल्पात केवळ तरतुदी केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात समाजाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा सैलती दिल्या जात नाहीत. मग अर्थसंकल्पातील तरतुदी आणि पैसा जातो कुठे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. यामागे खऱ्या अर्थाने बारामतीच्या काका पुतण्याने काळाबाजार सुरू केला आहे. परंतू, समाज आता हुशार झाला आहे. सरकारला नक्कीच जाब विचारेल, असेही त्यांनी म्हटले.
धनगर समाजाला बहुजनांप्रमाणे सैलती द्या, अन्यथा समज येत्या काही दिवसात मुबईत आदोलन करेल, त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास. कोण जबाबदार राहणार आहे, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
३१ मे रोजी जागर करण्याचे आवाहन
यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवही केला. ३१ मे रोजी धनगर समाजाने आरक्षणाचा जागर करावा. झोपी गेलेल्या सरकारला जागं करावं, असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी चौंडीला जाऊन दर्शन घेणार आहे. हा जयंतीचा कार्यक्रम लाईव्ह दाखवणार आहे. कोरोनामुळे इतरांना चौंडीला येता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी घरीच राहून अहिल्यादेवींच्या फोटोचं पूजन करावं. अहिल्यादेवींचं दर्शन घेऊन मी धनगर आरक्षणाचा विसर पडलेल्या सरकारला जागं करण्याचा निर्धार करणार आहे. कोव्हिड काळात एकत्र येणं शक्य नसल्याने समाज बांधवांनी सोशल मीडियाद्वारे एकत्रित येऊन या सरकारचा निषेध नोंदवावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.