दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. काल कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. आता यावर देशातील अनेक नेते टिका करत आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांचा स्वतःचा एक कायदा आहे त्यावर देशाचा कायदाही लागू होत होत नाही. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोन नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली यामध्ये त्यांची चूक काय? असा प्रश्न विचारत देशाचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशात एक अमानूष गुन्हा घडतो. अशावेळी संवेदना जपणाऱ्या काँग्रेस पक्षाचे दोन नेते पीडितेच्या परिवाराला भेटू इच्छितात यात त्यांची चूक काय? त्यांना अडवण्यात का आलं? धक्काबुक्की का करण्यात आली? असेही प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान या घटनेचा खासदार शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, असादुद्दीन ओवैसी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून निषेध करत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांना धारेवर धरले आहे.
Read Also :
कोरोनामुक्त झाल्यानंतर आता अमित शहा करणार बंगालची स्वारी https://t.co/R4mJ8WXm9O @Dev_Fadnavis @ChDadaPatil @AmitShah @DilipGhoshBJP @BhatkhalkarA @meNeeleshNRane @sachin_inc
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 2, 2020