प्रतिनिधी, स्नेहा निवते – नाव मोठं आणि लक्षण खोट.. ही म्हण आपण नेहमीच ऐकत असतो पण त्याचा खरा प्रत्यय आता आला आहे. नाव, कर्तृत्व आणि वय मात्र मोठं पण विचारसरणी छोटी (चुकीची) याच उत्तम उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले.. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वक्तव्याचे समर्थन करून त्यांनी आपली विचार करण्याची क्षमता किती कमी आहे हे दाखवून दिले आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौतनं केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं विक्रम गोखलेंनी समर्थन केलं. “1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला होता. स्वातंत्र्यासंबंधी कंगना रनौतने केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालेला असताना या वादात भर पडली म्हणजे विक्रम गोखले यांचा वक्तव्यामुळे विक्रम गोखले यावेळी म्हणाले की, कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले” असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी केला. तसेच “कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे,” असं वक्तव्य गोखले यांनी केलं.
“लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे.” असं वक्तव्य गोखले यांनी केलं.
यानंतर विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटू लागले. परंतु स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यावर अभिनेते विक्रम गोखले हे ठामचं होते. ‘खरं स्वातंत्र्य 2014 पासूनच मिळालं यावर ठाम असून ते बदलणार नाही’ असे त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले “माझी बाजू ऐकून घ्यायला तुम्हाला जाग आली तुम्ही आलात मी बोलणार, फक्त मी कोणाच्या संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही. विक्रम गोखले विरोधक आणि समर्थक यात गदारोळ सुरू आहे. माझ्या बाजूने मला संपवायचा आहे. ज्या विवादित मुद्यावर हा चालू आहे त्यावर मी बोलणार; विक्रम गोखले मी काय बोलतोय हे मी पण रेकॉर्डिंग करतोय.”
दरम्यान, विक्रम गोखले यांनी स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यांनंतर त्यांनी अनेक जणांनी वेठीस धरले, तर सोशल मीडियावर त्यांना मथ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले. यासर्व टीकाकारनं नंतरही विक्रम गोखले यांनी स्पष्टीकरण देत मी काही चुकीचं बोललो नव्हतो असेच सांगितले.
गोखले म्हणाले, ‘माझ्या 76 व्या वाढदिवशी जे भाषण झालं ते मूळ दाखवलं नाही भंपक प्रश्न विचारून माझं टाळलं फिरवणारे तुम्ही कंगना राणावत या मुलीची इतर भाषणे आहेत ती तिची वैयक्तिक मतं भारतीय स्वातंत्र्य (Indian independence) बाबत वक्तव्याला तिची कारणं असू शकतात त्याला मी दुजोरा दिला. त्यालाही माझी स्वतः ची कारणे असू शकतात त्या मुलीची माझी ओळख नाही. आम्ही काम केलं नाही कोणीतरी काही बोलल्याची दखल घेण्याबाबत मत व्यक्त करणे हा माझा अधिकार आहे. माझी राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी दुजोरा दिला त्याला माझीही कारणे असल्याचं गोखले म्हणाले.
तसेच गार्डियन पेपर वाचा 18 मे 2014 चा सगळ्यांनी वाचा तेच कंगना बोलली माझ्याकडे त्याची कॉपी आहे त्यामुळे कंगना काही चुकीचं बोलली नाही असं मी म्हणालो; ‘2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला स्वतंत्र मिळालं हे मत मी बदलणार नाही.’ त्यामुळे ज्यांना मी काय बोललो आहे मूळ भाषणात जे तुम्ही दाखवलं नाही. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला नाही. 2014 नंतर माझा भारत जागतिक पटलावर भक्कम उभा राहिला असल्याचही ते म्हणाले.
गोखलेंनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्राचं समर्थन देत. त्यांचं हे बोलणं कितपत खरे आहे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यामागील सत्य खरे सत्य असे की, १५ ऑगस्ट १९४७ र्जी स्वातंत्र्य मिळाले हे खरचं आहे. १९४७ आणि १९५० भारत देश हा स्वतंत्र होताच. पण प्रजासत्ताक नव्हता. याकाळात राज्यघटना अमलात आली नव्हती मात्र राज्यघटनेवर समितीत चर्चा सुरु होती. त्यांनतर २६ जानेवारी १९५० रोजी घटना अमलात आली. आणि भारत देश हा प्रजासत्ताक झाला. पण भारत प्रजासत्ताक होण्यापूर्वी राष्ट्रपती पद नव्हतं. तर गव्हर्नर जनरल हे पद अस्तित्वात होतं. या पदाची नियुक्ती औपचारिकता म्हणून ब्रिटन मधून केली जायची. लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. २१ जून १९४८ रोजी माउंटबॅटन निवृत्त झाले. ज्येष्ठ काँग्रेस नेते सी. राजगोपालचारी यांना त्यानंतर गव्हर्नर जनरल करायचं ठरवलं. त्यांचा नियुक्तीवर शिक्कामोर्तब व्हावा यासाठी नेहरूंनी ब्रिटन सरकारला पत्र लिहिले. आणि ती एक औपचारिकता होती विनवणी किंवा भीक नव्हे. हे या अकलेचे तारे तोडणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र त्यांनतर काही कायदेशीर गोष्टी करणे बाकी होते आणि नेहरूंनी जे केले त्याला ‘सत्तेचे हस्तांतरण’ असे म्हणतात.
त्यामुळे स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर काही बरळणाऱ्या या लोकांना नाव मोठं आणि लक्षण खोट.. नाहीतर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी म्हणायची वेळ आली आहे.