मुंबई : मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत आरक्षणाला स्थगिती दिली. हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे मत सरकारच्या वतीने प्रयत्न करणारेकाँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हंटले आहे. मात्र आजचा दिवस हा मराठा समाजासाठी काळा दिवस आहे आणि हा दिवस आणण्याचे काम ठाकरे – चव्हाण सरकारने केले आहे अशा शब्दात भाजप आमदार विनायक मेटे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारच्या मनातच नव्हते की आरक्षण टिकावे आणि ही त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे मात्र मी त्याचा निषेद करतो असे मेटे यावेळी म्हणाले. आरक्षणासाठी विनायक मेटे यांनी अनेकदा सरकारला सूचना केल्या होत्या तसेच मेटे यांनी यासाठी अनेकदा न्यायालयाच्या निर्णयाचा पाठपुरावा देखील केल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठासमोर करण्याचा निर्णयही दिला आहे.
तरच मराठा समाज आघाडी सरकारला माफ करेल
जर सत्ताधाऱ्यांना मराठा समाजाबद्दल थोडे जरी प्रेम असेल तर त्यांनी मराठा आरक्षण टिकवण्याच्या संदर्भात अद्यादेश काढावा आणि गरज पडल्यास एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्यावे तरच मराठा समाज त्यांना माफ करू शकेल अन्यथा माफ करणार नाही असे परखड मत विनायक मेटे यांनी यावेळी मानले.
मराठा समाजातील तरुणांना मेटे यांचे आवाहन
आघाडी सरकारच्या दुर्लक्षतेमुळे मराठा समाजातील तरुण तरुणींचे भविष्य अंधकारमय झालेले असले तरी,मराठा समाज हा लढवय्या आहे. त्यामुळे संघर्षाची तयारी आपल्याला पुन्हा एकदा करावी लागणार आहे. मराठा तरुणांनी हार मानता कामा नहे आपण पुन्हा एकदा संघर्ष करून आरक्षण मिळवू आणि यासाठी सर्व तरुणाईने सज्ज व्हावे असे आवाहन यावेळी मेटे यांनी मराठा समाजातील तरुणांना केले आहे.
Also Read
मातोश्रीवर धमकीचा फोन हे नाटक आहे,नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर ‘प्रहार’https://t.co/ZZbMSjsQiS@MeNarayanRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 9, 2020