मुंबई : कोरोनाची जागतिक महामारीच्या काळात पुण्यात जम्बो कोवीड सेंटर उभारल गेलं त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने २०० कोटी रुपये खर्च केले पण त्यात पारदर्शकता कुठेय? असा सवाल मनसे नेत्या आणि पुणे पदवीधर निवडणुकीच्या उमेदवार रुपाली ताई ठोंबरे यांनी केला आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिका निधी देण्यास नकार देत होती तेव्हा आम्ही पुणे महापालिकेत आंदोलन केलं.
त्यानंतर त्या आंदोलनानंतर सुद्धा रुग्णांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नव्हत्या, लोक मरत होती, सरकार आणि महापालिका म्हणून त्यांना सुविधा देणं आपली जबाबदारी आहे, ती देण्यात महाविकास आघाडी सरकार आणि पुणे महानगरपालिका अपयशी ठरलीये, अशी टीका ठोंबरे यांनी केली आहे.
रुग्णांना होणारा त्रास आणि जाच हे आम्ही पाहिलं आणि त्यांची मदत आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत गेलो, त्यामुळेच आज जनमानसाच्या मनात मनसे स्थान निर्माण करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिथं जिथं जनतेवर अन्याय होईल तेथे मनसे पॅटर्न ने आम्ही आंदोलन करू आणि जनतेच्या समस्याच निराकरण करत राहू, त्यासाठी आम्हाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांचा खंबीर पाठिंबा आणि मार्गदर्शन नेहमी मिळत आहे असं हि त्यांनी नमूद केलं आहे.
Read Also :
‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, नारायण राणेंची टीका
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी घेतली भेट
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल : मंत्री हसन मुश्रीफ