मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरासन केले. नुकसानाबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. तसेच त्यांनी आढाव बैठक घेत शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेतले. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टोलेबाजी देखील केली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल, त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार आहे, घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करू असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.
विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली. पाहणी दौरा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पावसाळा सुरुवात झाल्यापासून मी सातत्याने संपर्कात आहे, नुकसान किती होतेय, पावसाचा अंदाज याची माहिती घेत होतो, टार्गेट दिल्यासारखं पाऊस सगळीकडे पडतोय. ७२ वर्षात असा पाऊस पाहिला नाही असं एका वयोवृद्ध शेतकऱ्याने सांगितलं आहे. शेतकरी आणि आपत्तीग्रस्त हे संकटाच्या डोंगराखाली अडकलेले आहेत, त्या लोकांना दिलासा आणि धीर देण्यासाठी आम्ही इथं आलोय, सरकारकडून जे जे काही करणे आवश्यक आहे ते लोकांसाठी आम्ही करू, हे सरकार तुमचं आहे, परतीचा पाऊस आणखी किती दिवस चालेल, त्याचा फटका कितपत बसेल याचा अंदाज आला आहे. दुर्दैवाने ज्यांच्या घरातील माणसं दगावली त्यांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
Read also:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उगाच थिल्लरबाजी करु नये, फडणवीसांची ठाकरेंवर टीकाhttps://t.co/lD0Xr1vlQ9 @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020