वाशी : मराठा समाजासाठी ज्याने संघर्ष केला ते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो. फक्त राज्याचंचं नव्हे तर संपुर्ण जगाचं लक्ष मराठा आंदोलनाकडे लागलं होतं. आपण अतिशय संयतपणे, शिस्तीत, आंदोलन केलं. कुठेही आंदोलनाला गालबोट न लावता यशस्वी केलं. आपल्या आंदोलनाला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीत मराठा आरक्षणाबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांची घेतलेली शपथ पुर्ण केल्याचं त्यांनी म्हटले.
धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती असून नुकतीच बाळासाहेबांची जयंती देखील झाली. या दोन्ही गुरूंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या भूमित आज हा ऐतिहासिक लढा यशस्वी झाला. आमचं सरकार हे तुमचं सरकार असून शेतकऱ्याचं,. कष्टकऱ्यांचं सरकार आहे. आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले. मराठआ समाजाचा जो संघर्,ष आहे. मराठ्यांनी अनेकांना मोठं केलं. मोठमोठी पदं अनेकांना मिळाली.
जाहीरपणे छत्रपती शिवाजी महारांजांची शपथ घेतली. आणि ती शपथ पुर्ण करण्याचं काम पुर्ण करतो. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठा समाजाला न्याय देत असताना संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना, संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे.