मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित असलेल्या शिखर बॅंक घोटाळ्याचा मुद्दा वारंवार राज्यात चर्चेत येत आहे. अशातच आता पुन्हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिखर बॅंक आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा उकरून काढण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी अण्णा हजारे यांनी याप्रकरणाशी संबंधित आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टलाच आव्हान दिले आहे. त्यावरून राज्यात आता उलटसुलट चर्चा सुरू झालीय. त्यावरूनच शरद पवार गटातील नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
हेही वाचा..एनडीए आघाडीमध्ये लवकरच भूकंप होणार ? काही खासदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत
मला तर असं वाटतंय की हे सगळंं षडयंत्र भाजपतर्फे सुरू असावे. विरोधातील नेत्याला आपल्याकडे घ्यायचं, त्यानंतर त्याच्यासाठी पुन्हा चौकशीचा ससेमिरा लावायचा, त्याला बदनाम करायचे. एकेका नेत्याला राजकारणातून कायमचा उठवण्याचा हा भाजपचा प्रयत्न दिसतो आहे. दुध देनेवाली गाय जब तक दूध देती है, तब तक चारा खिलाते है, गाय दुध देना बंद कर देती है, तो उसको कसाई के पास भेजने की तयारी शुरू होती है, हे भाजपचं धोरण आहे. अजित पवार यांच्याबाबतही तसंच होत असावं, हा माझा अंदाज असल्याचेही अनिल देशमुख म्हणाले.
हेही वाचा..“बारामतीत झालेल्या पराभावासाठी मला चिंतन करण्याची काहीही गरज नाही”
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेच्या निवडणुकीत देखील भुजबळांनी डावलल्याची चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांची वर्णी लावली आहे. मात्र याठिकाणी भुजबळांनी देखील आपली इच्छा व्यक्त करून दाखविली होती. त्यावर विचारले असता अनिल देशमुख म्हणाले की, मला आश्चार्य वाटते की, दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्यावर भुजबळांचे लोकसभेचे तिकीट कापले. आता राज्यसभेवरही त्यांना संधी दिली नाही.
READ ALSO :
हेही वाचा..“अन्याय होत असेल तर छगन भुजबळांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत”
हेही वाचा…गजा मारणे अन् निलेश लंके भेट, अजित पवार गटाने डिवचलं, म्हणाले..