कल्याण : धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा धक्कादायक प्रकार कल्याण येथे समोर आलेला आहे. मध्य रेल्वेच्या आठगाव ते कसारा या रेल्वे स्थानकात ही घटना घडली. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची दखल घेत आता, मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार ? असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट केले की, 25 तारखेला आठगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. बंदी असताना या तरूणांनी रेल्वेत प्रवास कसा केला ? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
२५ तारखेला आठगाव ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. बंदी असताना या तरूणांनी रेल्वेत प्रवास कसा केला ? असे गुन्हे रोखण्यासाठी #दिशा_ॲक्ट राज्यात कधी लागू होणार का ? @AnilDeshmukhNCP @OfficeofUT
— Raju Patil (@rajupatilmanase) November 28, 2020
विनयभंगासारखे गुन्हे रोखण्यासाठी दिशा ॲक्ट राज्यात कधी लागू होणार का ? असा सवाल देखील त्यांना उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना ट्विटमध्ये टॅग करत विचारला आहे.
दरम्यान, कसारा येथे राहणाऱ्या एक 21 वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलमध्ये मोठय़ा पदावर कामाला आहे. नेहमीप्रमाणे 25 नोव्हेंबरला ही तरुणी ठाण्याहून लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यातून प्रवास करत होती. यावेळी आठगाव स्थानकावरुन रेल्वे गाडी निघाल्यानंतर दोन तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली होती. तिने लगचे तिच्या मोबाईलवर दोघांचे फोटो काढले. हे फोटो तिने तिच्या नातेवाईकांना तातडीने पाठविले.
या दरम्यान या दोघांनी तरुणीचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. या तरुणीने शेवटपर्यंत प्रतिकार करत होते. या झटापटीत तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत गाडी कसारा स्थानकात पोहोचली होती. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.