मुंबई : हुकूमशाही प्रवृत्तीचे उत्तरप्रदेश पोलीस कुठं आणि महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटात आमच्या रक्षणासाठी ढाल म्हणून उभे राहणारे महाराष्ट्र पोलीस कुठं? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तरप्रदेशच्या जंगलराजचा जाहीर निषेध केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ज्या पद्धतीने महिलांना आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींना वर्तवणूक दिली होती, त्यामुळे देशात असंतोष निर्माण झाला आहे. चाकणकर यांनी मुंबई पोलिसांबरोबर काही फोटो शेयर करत आपली भावना व्यक्त केली आहे.
हुकूमशाही प्रवृत्तीचे उत्तरप्रदेश पोलीस कुठं, आणि महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटात आमच्या रक्षणासाठी ढाल म्हणून उभे राहणारे महाराष्ट्र पोलीस कुठं.
उत्तरप्रदेशच्या जंगलराजचा जाहीर निषेध#MahaPoliceMyPride pic.twitter.com/RtPXSDNB0L— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 4, 2020
उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरण देशात प्रचंड गाजत आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. महिलांच्या सुरक्षेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक आणि महिला कार्यकर्ते सरकारवर करत आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. त्यानंतर ते काल हाथरस गेले होते. तिचे जाऊन त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
दरम्यान काल प्रियांका गांधींवर पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनामुळे देशातील अनेक नेते सरकारवर टिका करत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर तिचा करण्यात आलेला अमानुष खुनामुळं सध्या देशात संतापाची लाट आहे. हाथरस अत्याचार प्रकरणावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात या घटनेचा निषेध केला जात आहे.
Read Also :
एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे : शिवसेना https://t.co/8cc2YxbMAK @ShivSena @rautsanjay61 @ShivsenaComms @BJP4India @KanganaTeam
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 4, 2020