पंतप्रधान मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. पण जमिनीवर याची किती अंमलबजावणी झाली आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस एक अनोखं राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.
कुठे गेले ते वीस लाख कोटी रुपये? हा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र युवक काँग्रेस पर्दाफाश आंदोलन करणार आहेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली आहे.
10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पहिल्या दिवशी शेतकऱ्यांकडे जाऊन या 20 लाख कोटी पॅकेजचा काही लाभ मिळाला आहे की नाही व त्यांच्या प्रतिक्रिया व्हिडीओ चित्रित करणार आहेत. सोबतच पंतप्रधान कार्यालयाला फोन करुन आणि पत्र लिहून मागण्यासमोर ठेवायला मदत करणार आहेत. दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत.