यंदाचा गणपती उत्सव कोरोनाच्या सावटाखालीच घरच्या घरी साजरा होत आहे. यंदाही कोंकणवासी गणपतीसाठी गावाकडे निघाले आहेत. महाराष्ट्र सरकार मनसेने या कोंकणवासीयांसाठी विशेष एसटीची सोय केली आहे. मात्र, सततचा पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्य़ांचे हाल होतानाही दिसत आहेत. कित्येक ठिकाणी चाकरमान्यांना गावाबाहेरच पावसामुळे ताटकळत राहावे लागत आहेत.
याच मुद्द्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने कोंकणातील चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या दिल्या मात्र, राज्य सरकारने त्या नाकारल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावरून आशिष शेलार ठाकरे सरकारवर आक्रमक झाले आहेत.
रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही? प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले? ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कुठला आणि कसला हा राग काढला? असा प्रश्न त्यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारला विचारला आहे.
रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही?
प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले?
ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर
कुठला आणि कसला हा राग काढला?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 11, 2020