मुंबई: देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. अश्या परिस्थिती यामध्ये देशात पश्चिम बंगालची निवडणूक आणि कुंभ मेळावा यांमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमण वाढले आहे. उत्तराखंड येथे झालेल्या कुंभमेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे बंदोबस्तासाठी असेलेले पोलीस आणि मेळ्यात आलेले साधू-संत यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर कुंभमेळा प्रातिनिधिक स्वरूपात होत आहे . यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
कुंभ हा दर 12 वर्षांनी येतो … मग 2022 ला येणारा कुंभमेळा 2021 मध्ये का घेतला … केंद्र सरकारनी व राज्य सरकारनी त्याला मान्यता का दिली ….
कोरोनाचा झालेला प्रसाराची व त्यामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेणार का …..
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे अभिनंदन ….— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 21, 2021
कुंभमेळा सुरू होण्याच्या तोंडावरच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे कुंभमेळा रद्द करण्याची मागणी झाली. मात्र, त्याला नकार देण्यात आला. कुंभमेळ्यात लाखो भाविक एकत्र आल्याने अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे अनेक आखाड्यांनी कुंभमेळा समाप्त झाल्याची घोषणा केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर प्रातिनिधिक स्वरूपात कुंभमेळा पार पडला. परंतु या घोषणेच्या आधीच अनेक साधूंना आणि संतांना कोरोनाची लागण झालेली होती. यामुळे अनेक साधूंना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
त्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये आव्हाड म्हणाले, कुंभ हा दर 12 वर्षांनी येतो मग 2022 ला येणारा कुंभमेळा 2021 मध्ये का घेतला ? केंद्र सरकारनी व राज्य सरकारनी त्याला मान्यता का दिली? कोरोनाचा झालेला प्रसाराची व त्यामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेणार का?महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे अभिनंदन करतो असे आव्हाड यांनी म्हटले आहे. या ट्विटमध्येच आव्हाडांनी नेपाळचे पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र वीर विक्रम शाह देव आणि राणी कोमल यांना कोरोना झाल्याचे म्हटले आहे. ते हरिद्वामधील महाकुंभमेळ्याला उपस्थित होते, असंही आव्हाड यांनी सांगितले. ट्विटमध्ये आव्हाडांनी राजे ज्ञानेंद्र यांचा फोटोही शेअर केला आहे.