मुंबई : मुंबईतील पाणी तुंबले म्हणून ओरडणारे अहमदाबादमध्ये पाणी तुंबते तेव्हा मात्र शांत असतात असा सवाल करत शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचं पाहायला मिळाले आहे. कलानगरमधील पाणी लवकर का ओसरते? आणि इतर ठिकाणी पाणी का साचते आसा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. शेलारांसह काही भाजप नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. आता शिवसेनेने भाजप नेत्यांना फैलावर घरातले आहे.
1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता. मुंबईसारख्या शहराला कमी वेळात अतिवृष्टी होणे आणि त्याच वेळी समुद्राला भरती असणे हा ‘योग’ नवीन नाही. त्याचाही दुष्परिणाम सखल भाग जलमय होण्यात होत असतो. तरीही मुंबईच्या नावाने काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक आपले बोंबा मारणे सुरूच ठेवतात,” असा टोला शिवसेनेने विरोधकांना लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून मुंबई तुंबण्याची कारणं देतानाच विरोधकांवरही टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
दरवर्षी मुंबईत जोरदार पाऊस होतो. मुंबईकर या कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जातात,पोलीस आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी ,नागरिक हे या संकटाला तोंड देतात. मात्र भाजप नेते फक्त मुंबई तुंबली कि लगेच ओरडतात, तेवढी हिंम्मत ते नागपूर किंवा अहमदाबाद तुंबल्यावर दाखवत नाहीत असा घणाघात शिवसेनेने भाजपवर केला आहे.
Read Also;
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020