प्रतिनिधी/ ओंकार गोरे
पुणे : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज ४० ते ५० हजाराच्या घरात एकट्या महाराष्ट्रामध्ये नागरिक कोरोना पॉझिटिव येत आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. रुग्ण त्यांचे कुटूंबीय, नातेवाईक बेड तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धावाधाव करत आहेत. अशा परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध भागातील रुग्णालयाला भेटी देवून नागरिकांना धीर देणे, त्यांना मदत पुरवणे, तातडीने त्यांचे लसीकरण करणे आणि इतर सुविधा पुरवून परिस्थिती हाताळणे महत्वाचे आहे. परंतू उद्धव ठाकरे संयमी नेतृत्वाच्या नावाखाली केवळ मातोश्रीमध्ये बसून फेसबूक लाईवच्या माध्यमातून मुंबई मॉडेलचे कौतूक करण्यात मश्गुल असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे स्टेरिंग हातात घेवून उपदेशाचे डोस पाजणारे शरद पवार मुंबईतील बारमालकांना पत्र लिहिण्यात व्यग्र असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फक्त मुंबई शहराची काळजी असलेल्या या संयमी नेतृत्वाने उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे का? की उद्धव ठाकरे शरद पवारांकडून मिळणाऱ्या डोसची वाट पाहत आहेत?, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटतांना दिसत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांचे तातडीने लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, सरकार आणि राजकीय नेटकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या सुडबुद्धीच्या राजकारणात सर्वसामान्यांना लस कधी मिळणार याचा काही अंदाज देखिल वर्तवला जात नसल्याचे चित्र आहे. सामान्य जनतेला पोकळ घोषणांच्या आधारवर भ्रमित करण्याचा डाव रचला जात आहे का?, हा प्रश्न आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानुसार केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक लसी मिळाल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असलेले आदित्य ठाकरेंनी मुंबईचे लसीकरण पुढच्या तीन दिवसात पुर्ण करू, असा दावा केला होता. दुसरीकडे ठाकरे सरकार आणि त्यातील उर्वरित नेटकरी महाराष्ट्राला लसीकरणात केंद्रसरकार दुजाभाव करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्राकडून अत्यंत कमी प्रमाणात लसी राज्याला पाठवल्या जात असल्याने राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला तथा रखडला असल्याची टीका करत आहेत. या सुडबुद्धीच्या राजकारणात सामान्यांचे लसीकरण कधी होईल?, याचा अंदाज बांधणे देखिल कठीण झाले आहे.
उपदेशाचे डोस देणारे शरद पवार कुठे आहेत?
मार्च २०२० मध्ये भारतात तथा महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आली होती. कोरोना नेमका काय प्रकार आहे? ही सांगणे सुद्धा सामान्यांच्या कठीण होते. कारण, मृत्यूचे भय आणि शारिरीक आजारापेक्षा मानसिक आजारात प्रभावी ठरलेल्या कोरोनाने सामान्य जनता जखडली होती. अशा परिस्थिती लोकप्रतिनिधींनी विशेषत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात फेरफटका मारून जनतेला मानसिक आधार देणे गरजेचे होते. परंतू मातोश्रीवर ठाम मांडून बसलेल्या मुंख्यमंत्री मुंबईच्या बाहेर पडायला तयार नव्हते.
अशा वेळी शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देली. त्यावेळी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार सांगतात की…. “आता उद्धवने बाहेर पडायला हवे”.. म्हणजे काय? तर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील उर्वरित महाराष्ट्रात प्रत्यक्ष जाऊन रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचाच परिणान म्हणून संयमी नेतृत्व मानल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पुणे दौऱ्याचे परिपत्रक जारी करून तातडीने पुणे दौरा केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले असताना अत्यपही मुख्यमंत्री मुंबईत ठाण मांडून बसलेले आहे. मुख्यमंत्र्यांना केवळ मुंबईचीच काळजी आहे का?, उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे का?, की मुख्यमंत्री महाविकास आघाडी सरकारचे स्टेरिंग हातात घेवून फिरणाऱ्या शरद पवारांच्या उपदेशाची (आदेशाची) वाट पाहत आहेत? हे सांगणे देखिल कठीण झाले आहे.
पत्रकारांच्या फ्रंटलाईन वर्कर दर्जाचे काय?
पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा धोका आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी यापूर्वीच पत्रकारांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेतला आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी अनेक नेत्यांनी केली आहे. विशेषत, म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा धोका आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. pic.twitter.com/JNJXZbpqBe
— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 4, 2021
राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांना पत्र.. pic.twitter.com/q7Peo26NP5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 12, 2021
त्याच बरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, राष्टवादीचे नेते छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांनी चोहो बाजूनी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. परंतू, प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत. फेसबुक लाईवच्या माध्यमातून केवळ ‘मुंबई मॉडेल’चे गुणगाण गाण्यातच दंग आहेत का?, का चारही बाजूने होणाऱ्या पत्रकारांच्या फ्रंटलाईन दर्जाची मागणी करणारे नेते येडे म्हणायचे का?, मुख्यमंत्री बार मालकांना पत्र लिहिणारे शरद पवार निर्णय घेण्यासाठी मला कधी पत्र लिहितात याची वाट पाहत आहेत का?, त्यांना केवळ मुंबईचे भले करायचे आहे?, पुन्हा प्रश्न तिथेच.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे.आपण ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी,पोलीस कर्मचारी,सफाई कर्मचारी,आरोग्य pic.twitter.com/qHnUlX5D8j
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) May 10, 2021
महाविकास आघाडी सरकारचे ताळतंत्र जमेना?
एकीकडे मुख्यमंत्री कुठल्या विषयावर बोलणे तर सोडा मुंबईच्या बाहेर पडायला तयार नाहीत. त्यातच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात पत्रकारांना फ्रंटलाईन दर्जा देण्याच्या मागणीवर आडून बसले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री संयमी नेतृत्वाच्या नावाखाली मुठ गिळून गप्प बसलेले आहेत. आपल्याच सरकारमधील नेत्यांकडून होणाऱ्या मागणीवर कोणतीही प्रतिक्रीया द्यायला तयार नाहीत. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा?, मुख्यमंत्री आणि शरद पवार वगळता इतर कोणत्याही नेत्याला त्यांच्या मनासारखा निर्णय घेण्याचा अधिकार नाही का?, की महाविकास आघाडी सरकारमधील उर्वरित नेत्यांच्या बोलण्याला मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीकोणातूतन कोणत्याही प्रकारची किंमत नाही?, की फक्त उपदेशाचे डोस शरद पवारांनीच द्यायचे?, नेमका कोणता अर्थ उर्वरित नेत्यांनी आणि जनतेने घ्यायचा?, याकडे कोणाचेही लक्ष राहिलेले नाही.
मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर?
राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे, परिणामी रखडलाच आहे. केंद्रसरकारकडून लसीचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसून केंद्र लसीकरणात दुजाभाव करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे हेच आरोप करणारे आघाडी सरकार महाराष्ट्र लसीकरणात अव्वल असल्याचे सांगून केंद्राने ‘मुंबई मॉडेल’चा आदर्श घ्यावा, असे सांगत आहेत.
त्यातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबईकरांचे लसीकरण तीन दिवसात पुर्ण करण्याचा दावा केला आहे. जर लसीचा तुटवडा जाणवत असताना पुढील तीन दिवसात मुंबई सारख्या शहराचे लसीकरण पुर्ण होत असेल तर मग उर्वरित महाराष्ट्रात लसीकरण का रखडले आहे?, उर्वरित महाराष्ट्राला लस वेळेत का मिळत नाही?, मुख्यमंत्र्यांना केवळ मुंबईकरांचेच हीत जोपासायचे आहे का?, त्यांना फक्त मुंबईचाच एवढा पुळका का?, केवळ मुंबई शहरापुरतेच मुंख्यमंत्रीपद मर्यादित आहे का?, उर्वरित महाराष्ट्राशी काही घेणे-देणे नाही का?, म्हणजे उर्वरित महाराष्ट्र एक प्रकारे वाऱ्यावरच सोडला आहे का?, हे तुम्हीच ठरवा.