मुंबई: कोल्हापूर येथे खासदार संभाजीराजे यांनी मराठा मुक मोर्चा काढला होता. या मूक मोर्चाला राजकीय सर्व पक्षाचा पांठिबा मिळाला. तसेच सरकार ही राजें यांच्या मागण्याबाबत सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्याने सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेत्यांना एकाच मंचावर आणण्यासाठी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हालचाली सुरु केल्या आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना एकाच मंचावर आणण्यात येणार असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
विजय विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात येत्या २६ आणि २७ जून रोजी ओबीसींना आरक्षण मिळावं, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी एका शिबीराचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय शिबिराचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत. या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
चिंतन शिबिरामागे राजकीय हेतू नाही
ओबीसींच्या प्रश्नावर पक्षापलिकडे जाऊन गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. हे शिबिर बोलावण्यामागे कोणतंही राजकारण नाही किंवा कोणतीही राजकीय भूमिका नाही. तसे असते तर मी सर्व पक्षीय नेत्यांना बोलावलं नसतं. मी कोणत्याही संघटनेत नाही. समाजाचा घटक आणि कार्यकर्ता म्हणून ओबीसी आरक्षणावर लढत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.